ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करत असतात. यामुळे काही राजयोग किंवा अशुभ योग निर्माण होतात. ग्रहांच्या स्थितीचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो.
सूर्यदेवाने नकतेच कुंभ राशीत गोचर केले आहे. सूर्यदेव कुंभ राशीत आल्यानंतर सूर्यदेवाच्या दोन्ही बाजुला दोन ग्रह स्थित आहेत. एक ग्रह राहू तर दुसरा ग्रह मंगळ आहे. सूर्यदेवाच्या दोन्ही बाजुला दोन ग्रह आल्याने ‘उभयचरी राजयोग’ निर्माण झाला आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ मानला जातो.
कुंडलीतील या राजयोगामुळे त्या व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात खूप प्रगती करता येते. त्यामुळे या शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ?
मकर राशी
उभयचरी राजयोग या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. मकर राशीच्या लोकांसाठी रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे.
अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. तसेच परदेशात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर, या काळात मकर राशीच्या लोकांचे जोडीदारासोबतचे नाते चांगले राहण्याची शक्यता आहे.
प्रेमविवाहानंतर संसार तुटण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, तीन हजार प्रेमीयुगुलांनी घेतली भरोसा सेलची मदत
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी उभयचरी राजयोग लाभदायी ठरु शकतो. या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय चमकण्याची शक्यता आहे. तुमची महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल ठरु शकतो.
तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नोकरीत असलेल्या लोकांनाही बढती मिळू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी
उभयचरी राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ सिध्द होऊ शकते. घर किंवा जमीन खरेदीचा योग जुळून येऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. कष्टाचं गोड फळ मिळण्याची शक्यता आहे.
तुमच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवे मार्ग सापडण्याची शक्यता आहे. प्रेमात असाल तर प्रेमसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो.