फक्त “श्री स्वामी समर्थ” या नामस्मरणाचे फायदे जाणून घ्या सविस्तर!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो श्री गुरु माउली उवाच, “श्री स्वामी समर्थ”- आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची दु:खे येतात, क्ले’श सहन करावे लागतात. काही वेळा दु:ख वाट्याला येत तेव्हा खरोखर आपली नेमकी चूक कळत नाही. वाटत, ‘मी कुणाचंच वाईट करत नाही, मग माझ्याच वाट्याला हे का?’

आयुष्यात आनंदी आनंद असेल तर आपली काहीच तक्रार नसते पण कोणतही दु:ख आलं की कधी यातून सु’टका होते यासाठी त्या दु:खाला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी इतर उपाय सुरु होतात. कोण सांगेल ते विधी, पूजा, व्रत, बु’वाबाबा नवस, पोथ्या यांची पारायण होतात. कसही करुन सुटका करुन घ्यायची असते.

पण हे प्रा’रब्ध भो’ग असतात, ते भो’गूनच संपवावे लागतात. परंतु बरीचशी दु:ख विनाकारण ओढवून घेतली जातात, वाट्याला येणार्या दु:खाचा त्रा’स समोरचा सुखात आहे हे पाहून अधिक बळावतो. आर्थिक सं’कट, क’र्ज, आ’जारपण, कौटुंबिक क’लह, नोकरीत क’टकटी, फ’सवणूक, व्य’सनाधीनता, दा’रिद्र्य अशा गोष्टींना सामोर जाव लागलं की आपण अस्वस्थ होतो, शांत राहू शकत नाही.

२६ जुलैची पूरस्थिती सर्वांना आठवतच असेल. सर्वत्र फक्त पाण्याचं साम्राज्य होत. वाटा दिसत नव्हत्या, तरीही डोळ्यांसमोर घरी पोहोचणं हेच ध्येय होत. त्यावेळी चालताना गटाराचं पाणी आहे, पायाखाली नेमकं काय येईल समजत नाही, पुढे येणारा मदतीचा हात तेवढा दिसत होता, कोणाचा हात धरतोय हा विचारही नव्हता, तहान भूकेला बकाल वस्तीतून मिळालेला वडापाव, पाणी कशाकशाचंच वावगं नव्हत. हे सर्व महत्त्वाच नाही तर यातून घरी पोहोचणं महत्त्वाचं, एवढाच ध्यास मनात होता. त्यामुळे कसलाच बा’ऊ झाला नाही.

आपल्या आयुष्यात येणारी सुखदु:ख सुद्धा अशीच असतात. त्यांचा बाऊ न करता त्यातून वाट काढत राहिलं पाहिजे, हे सर्व असणारच, ते सहन केलच पाहिजे असा विचार करत माझ्या मुक्कामी, माझ्या भगवंताकडे मला पोहोचायचं आहे, अशी भा’वना आपण म’नात दृढ करु शकणार नाही का!

मुळात ही सुखदु:ख माझी आहेत, ह्या खोट्या भा’वनेत आपण पुरते गुंतून जातो. पण ही सुखदु:ख केवळ ह्या देहाची आहेत, आणि हा देह म्हणजे “मी” नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काही वाटून घ्यायचं कारणच नाही. काठावर बसून पाहणार्याला बुडायची भिती नसते. ह्या आयुष्याकडे आपणही असच काठावरुन पहायला शिकलं पाहिजे. रोजच्या जीवनात अनेक प्रसंग. घटना, क्षण बरच काही देवून जातात. शिकवतात. कधी सुखावणारं कधी दुखावणारं, हवहवस वाटणारं, नकोसं झालेलं, अस बरच काही आपण अनुभवतो.

आयुष्याकडे स्वत:ला दूर करुन पहाण्याच्या खेळात किती मौज वाटेल पहा. कोवळ्या सूर्यकिरणांनी उजळणारं आयुष्य, कधी निराशेच्या मिट्ट काळोखाने काळवंडून जाणारं आयुष्य! ह्या जीवनात शीतल गारवा, बोचरी थंडी, उन्हाचा तप्तपणा कधी थंडगार जलधारांचा वर्षाव होतच रहातो. सुखाचा किंवा दु:खाचा वाटणारा प्रत्येक क्षण सेकंदासेकंदाला मागे पडत आयुष्य पुढेच सरकत असत. आपण मात्र त्या क्षणांमधेच कायम अडकून घेतो.

आरशात पाहून कसं स्वत:ला ठीकठाक करतो, तसंच आयुष्याकडे समोरुन पहाताना त्यातील बर्याच गोष्टी आपण सुधारु शकू. जीवन उजळवणं आपल्याच हाती आहे. असा जेव्हा आपण प्रयत्न अगदी तळमळीने करतो, तेव्हा मार्गातले अडसर स्वामीकृपेने दूर होवू लागतात. आयुष्यात नको त्या गोष्टींची चिंता करायचं सोडून आपण स्वामी नामाचं “चिंतन” करु या, चला स्वामीनाम म’नोभावे जपू या.

दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री गुरुमाऊलीं म्हणतात “श्री स्वामी समर्थ” या नामस्मरणाने खरोखर एवढे च’मत्कार होतात!

१) श्री स्वामी समर्थ नामाने, सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते. इतके दिवस षड्-रिपु आपल्या म’नात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने ह’ल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. म’नात विचारांची गर्दी होणे, हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घा’बरुन ना’मस्मरण करणे सोडून देतात.

२) श्री स्वामी समर्थ नामाने, कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदा. प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितिय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे. साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात.

३) श्री स्वामी समर्थ नामाने, काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने, शांत झोप लागते. वेळेवर जागही येते.

४) श्री स्वामी समर्थ नामाने, निश्चित्तच च’मत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो. एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल. ते सुरुवातीला एकांतात होते. समाजापासुन अ’लिप्त रहात होते. साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली.

५) श्री स्वामी समर्थ नामाने, पशु पक्षीही साधकांना घाबरत नाहीत. सा धना योग्य दिशेने जाते, हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.

६) श्री स्वामी समर्थ नामाने, स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक क’वच तयार झालेले असते, त्यामुळे आ’त्म्यांना प्रवेश मिळत नाही.

७) राग येत नाही. हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे. नामस्मरण करुनही तुम्हाला रा’ग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच त्याचा अर्थ होतो.

८) श्री स्वामी समर्थ नामाने, आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जात रहाते, तशी त्यांची वा’सना कमी कमी होत जाते.

९) श्री स्वामी समर्थ नामाने, क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. ना’मस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे.

Leave a Comment